मुंबई : पंतप्रधान मोदींनी बाहेर देशात शिष्ट मंडळ पाठवण्यापेक्षा भारत-पाक सामनेर बहिष्कार टाकणं हे मोठे ठरलं असतं. उद्या सकाळी 11 वाजता सर्व महिला जमणार असून एकाच मोठ्या डब्यामध्ये सिंदूरच्या पुड्या पाठवणार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही मोदींनी दमदारपणे सांगितलं पाहिजे हा सामना होणार नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या आजूबाजूला बसलेले जे अंडू पांडू लोक आहेत, जय शाहसुद्धा ज्याप्रकारे नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणाले त्याच प्रकारे तुम्ही जय शाहसुद्धा देशद्रोही म्हणणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पहलगाममध्ये जो हल्ला झाला त्यामधील मृतांचं रक्तही अजून सुकलेलं नाही, तो घाव अजूनही भरलेला नाही. त्यावेळी आपल्या सर्वांना असं वाटलं होतं की आता पाकिस्तानला जागेवर ठेवणार नाही. पाकिस्तानचे दोन-तीन तुकडे करू, त्या दृष्टीने एक युद्ध केला गेला आणि त्याला नाव ठेवण्यात आलं होतं ‘ऑपरेशन सिंदूर‘. संरक्षण मंत्र्यांनी हे सांगितलं होतं की अजूनही ऑपरेशन सिंदूर हे सुरू आहे, पाकिस्तान नेहमी नेहमी काही दिवसांनी आपला हल्ला करतात त्यावेळी आपले सैनिक शौर्य दाखवतात. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प म्हणतात की त्यांनी हे युद्ध थांबवलं, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पाकिस्तानच्या एका प्रशिक्षकाला भारतामध्ये आमंत्रण दिलं होतं. तो प्रशिक्षक आलेला की नाही याबद्दल माहिती नाही पण त्या नीरज चोप्रांना काही अंधभक्तांनी देशद्रोही म्हटलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.




